जलसंपदा विभाग भरती 2025 | 2100 रिक्त जागा; वाचा सविस्तर | Patbandhare Vibhag Bharti 2025

Patbandhare Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र जलसंपदा/पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ पदाच्या 1685 आणि सहाय्यक अभियंता पदाच्या 545 जागा रिक्त आहेत. विभागातील कर्मचाऱ्यांवर विविध प्रकल्पांचा वाढता ताण असल्याने या जागांची भरती तातडीने करावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही पदभरती झाली नसल्याने लाखो उमेदवार चिंतेत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पाटबंधारे विभागात भरपूर पदे रिक्त

पाटबंधारे विभागातील स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी क्षेत्रातील जागा भरपूर जागा रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे जलसंपदा प्रकल्पांची अंमलबजावणी मंदावली असून कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार देण्यात आला आहे. विदर्भासाठी आणि कोरडवाहू भागांसाठी महत्त्वाचा असलेला ‘वैनगंगा-नळगंगा खोरे जोड” या सारखे महत्त्वाचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागातील रिक्त जागांची भरती लवकर करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन सेवाप्रवेश नियम आणि उमेदवारांची चिंता

पदभरतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागच्या वर्षी नवीन सेवाप्रवेश नियम लागू केले आहेत. या अंतर्गत डिप्लोमा, डिग्री आणि उच्च शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र ठरवले गेले होते. मात्र, कोरोनामुळे आणि प्रशाशकीय विलंबामुळे भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार अस्वस्थ झालेले आहेत.

भरती त्वरित सुरू करण्याची मागणी (Jalsampada Vibhag Bharti 2025)

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसह इतर बेरोजगार तरुणांनी जलसंपदा विभागाकडे तातडीने जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केलेली आहे. रिक्त पदे भरल्यास जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल आणि विभागातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण सुद्धा कमी होईल.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

FAQ

१. जलसंपदा विभागात सध्या किती पदे रिक्त आहेत?
उत्तर: कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ – 1685 आणि सहाय्यक अभियंता – 545, एकूण 2230 पदे रिक्त आहेत.

२. ही पदभरती इतकी महत्त्वाची का आहे?
उत्तर: प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी ही भरती अत्यावश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

३. कोणते प्रकल्प रखडले आहेत?
उत्तर: वैनगंगा-नळगंगा खोरे जोड प्रकल्पासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत.

४. भरती प्रक्रिया रखडण्याचे कारण काय आहे?
उत्तर: कोरोनाचा परिणाम आणि प्रशासकीय विलंबामुळे ही प्रक्रिया मागे पडली आहे.

५. नवीन सेवाप्रवेश नियम काय आहेत?
उत्तर: डिप्लोमा, डिग्री आणि उच्च शिक्षण पात्रता असलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते.

1 thought on “जलसंपदा विभाग भरती 2025 | 2100 रिक्त जागा; वाचा सविस्तर | Patbandhare Vibhag Bharti 2025”

Leave a Comment