Bombay High Court Recruitment 2025 : काल मंत्रिमंडळामध्ये निर्णय जाहीर केल्यानुसार राष्ट्रीय बांबू धोरण जाहीर केलेले आहे यामध्ये पाच लाखाच्या वर रोजगाराचे निर्मिती होणार आहे असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यासोबतच मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा भरती केल्या जाणार आहे त्याविषयीची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2000 वरून अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये औरंगाबाद खंडपीठ सुद्धा समाविष्ट राहणार आहे यामध्ये 2228 पदांचा समावेश असून या भरती प्रक्रियेमध्ये गट-अ पासून गड पर्यंतच्या पदाचा समावेश राहणार आहे एकूण 2228 पदांसाठीची ही भरती काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
महामंडळात विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | MSRTC Bharti 2025
भरती प्रक्रियेची सर्व माहिती त्याची पात्रता व कधीपासून कधीपर्यंत व कशा पद्धतीने अर्ज करायचे आहे त्याच्याविषयी माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे असेच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका या पदभरती मध्ये गट अ पासून ते गट ड पर्यंतच्या पदांचा समावेश आहे म्हणजे लिपिक शिपाई अधिकारी विधी अधिकारी स्वयंपाकी माळी इत्यादी पदांचा या भरती प्रक्रियेमध्ये समावेश असू शकतो
महाराष्ट्रातील न्यायप्रणाली अधिक गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य शाखा, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांसाठी एकूण २,२२८ नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत. ही भरती माहिती तंत्रज्ञान (IT) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढवून न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने करण्यात येत आहे.
पदांची विभागणी:
- मुख्य शाखा (मुंबई): ५६२ पदे
- अपील शाखा: ७७९ पदे
- औरंगाबाद खंडपीठ: ५९१ पदे
- नागपूर खंडपीठ: २९६ पदे
गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील पदे:
या पदांमध्ये वरिष्ठ अधिकारी ते सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असून, न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणारी मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी ही भरती केली जात आहे.
पुढील प्रक्रिया:
- न्यायालयाने २२ ऑक्टोबर २०२४ रोजी आवश्यक मनुष्यबळाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
- शासनाने त्या अहवालाच्या आधारे पदनिर्मितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
- ही पदे अस्थायी स्वरूपाची असतील आणि त्यांची मुदतवाढ वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केली जाईल.
- वेतनश्रेण्या वित्त विभागाकडून प्रमाणित केल्यानंतरच भरती प्रक्रिया सुरू होईल.
- सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतरच ही पदे भरली जातील. हे नियम दोन महिन्यांच्या आत शासनाच्या मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
FAQ
1. २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात किती नवीन पदे मंजूर झाली आहेत?
उत्तर: एकूण २,२२८ नवीन पदांना शासनाची मान्यता मिळाली आहे.
2. ही पदे कोणत्या संवर्गात असतील?
उत्तर: गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गात ही पदे भरली जातील.
3. कोणत्या शाखांमध्ये ही पदे निर्माण केली जातील?
उत्तर: मुंबई मुख्य शाखा, अपील शाखा, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात ही पदे असतील.
4. न्यायालयीन कामकाजात सुधारणा करण्यासाठी कोणता तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे?
उत्तर: माहिती तंत्रज्ञान (IT) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढवला जाणार आहे.
5. ही पदे कायमस्वरूपी असतील का?
उत्तर: ही पदे अस्थायी स्वरूपाची असून, मुदतवाढ वित्त विभागाच्या निर्देशानुसार केली जाईल.
6. भरती प्रक्रिया कधी सुरू होईल?
उत्तर: सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतरच भरती प्रक्रिया सुरू होईल